
संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : १३ ऑगस्ट २०२० : नागपूरः ‘लॉकडाउनला चार महिने झाले. प्रत्येक वेळी स्थिती सामान्य करण्याचे आश्वासन केंद्र व राज्य सरकार देत आहे. राज्यकर्त्यांच्या घोषणांमुळे नव्याने सुरुवात करण्याच्या आशेत वंचित समूह आहे. मात्र त्या दिशेने कुठलेही ठोस पावले उचलली नाही. दुकानांवरील बंदी उठवावी, जनजीवन सुरळीत करावे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारने नियम तयार करावे, जनतेला ते मान्य राहतील,’ असंही ते म्हणाले
राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरु झाल्याच पाहिजे या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी नागपुर येथे स्वतः डफली वाजवत आंदोलनाचे नेतृत्व केलं.
‘महाराष्ट्र राज्य हे एकेकाळी देशाला दिशा दाखवणारे राज्य होते पण आता हे दुसऱ्यांचेआदेश पाळणारे राज्य बनले आहे, सरकार खासगी वाहतूकीला परवानगी देतेय, तेव्हा खासगी वाहतूकीतील कर्मचाऱ्यांना करोना होत नाही. मग सरकारी वाहतूक सेवेतील लोकांनाच करोना कसा होणार? हे शासनानं सांगावं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, आजचं आंदोलन हे फक्त इशारा देण्यासाठी आहे, जनजीवन सुरळीत केलं नाही तर १५ ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू,’ असा इशारा सुध्दा यावेळी त्यांनी दिला आहे. ‘६००-७०० भाडे असावे तेथे खासगी ट्रॅव्हल्स चार ते पाच हजार रुपये आकारतात. ही लुट सरकार करवित आहे. सार्वजनिक वाहतुकीमुळे प्रवाशांची लुट होण्याऐवजी सोय झाली असती.’ असंही ते म्हणाले.
असेही त्यांनी म्हटलं होते कि लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली असून लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून येत्या १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. वंचितकडून डफली वाजवून सरकारला जाग आणण्याचं काम करण्यात येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षप्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली आहे.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे, असेही त्यांनी म्हटलं आहे.